● मालवाहू वाहनातून कापूस लंपास
● नांदेपेरा येथील घटना
आधीच शेतकरी संकटात सापडला असतांना आता चोरांच नवं संकट त्यांच्या पुढे उभे झाले आहे. शेतातील बंड्यात असलेल्या 40 पैकी 20 क्विंटल कापूस मालवाहू वाहनातून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी उजेडात आली आहे.
नांदेपेरा येथील शेतकरी रवी जैस्वाल यांच्या शेतात कपाशी पिकाची लागवड केली होती. उत्पादनही चांगले झाले होते. कापसाचा भाव वाढत असल्याने दोन पैसे जास्त मिळतील म्हणून जैस्वाल यांनी शेतातील बंड्यात कापूस साठवून ठेवला होता.
रविवार दि. 5 डिसेंबर ला सकाळी नेहमी प्रमाणे गडी शेतात गेला असता त्याला कापसाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 20 क्विंटल कापूस वाहनातून नेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत जैस्वाल यांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
वणी: बातमीदार