● राजूर कॉलरी परिसरातील घटना
रोखठोक | मन हेलवणारी घटना राजूर कॉलरी परिसरात उघडकीस आली. तब्बल पंधरा ते वीस मोकाट जनावर दगावल्याची बाब रविवार दि 25 डिसेंबर ला दुपारी उजागर झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.
राजूर कॉलरी परिसरसतील गुप्ता कोलवॉशरी परिसरात मोकाट गोवंश दगावत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. एक-एक करत पंधरा ते वीस मोकाट जनावरांनी तडफडत जीव सोडला. हा काय प्रकार आहे हे काळायला मार्ग नव्हता. जनावरांच्या तोंडातून फेस येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले.
परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत पिकावर ताव मारणाऱ्या वन्य जीव व मोकाट जनावरामुळे प्रचंड नुकसान होत होते. यामुळेच त्या पीडित शेतकऱ्याने शेतात थीमेट हा विषारी पदार्थ ठेवला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. त्या शेतकऱ्याने वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हे कृत्य केले असावे असे सुद्धा बोलल्या जात आहे.
राजूर कॉलरी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी असे मत स्थानिक व्यक्त करताहेत. शेतात ठेवलेले ते विष वन्य प्राण्यांसाठी होते का हे सुध्दा तपासण्या ची गरज निर्माण झाली आहे.
वणी : बातमीदार