Home Breaking News कुलूपबंद घर फोडले, लाखोंचा ऐवज लंपास..!

कुलूपबंद घर फोडले, लाखोंचा ऐवज लंपास..!

● नवीनतम ठाणेदारांला चोरट्यांची सलामी ● श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट वणीत ● LCB पथक तपास यंत्रणेत सहभागी

0
C1 20250203 23253555

नवीनतम ठाणेदारांला चोरट्यांची सलामी
श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट वणीत
LCB पथक तपास यंत्रणेत सहभागी

Crime News | शहरातील साधनकर वाडी परिसरात कुलूपबंद घराला चोरट्यांनी लक्ष केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेत लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचे बोलल्या जात असले तरी घरमालक घरी परतल्यावरच नेमकी किती चोरी झाली हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी अक्षय प्रदीप चिंडालिया यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले आहे. There was an incident where thieves targeted a locked house

मागील काही महिन्यांपासून येथील पोलीस यंत्रणेवर गंडांतर आल्याचे दिसत आहे. विविध प्रकारचे किस्से आणि घटना घडामोडी घडताहेत. कायदा व सुव्यवस्था खरंच धोक्यात आली का ? हा विषय संशोधनाचा असला तरी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र मावळत्या ठाणेदाराला बसला अशी चर्चा रंगायला लागली आहे.

Img 20250103 Wa0009

नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार गोपाल उंबरकर यांना चोरट्यांनी सलामी देत कुलूपबंद घराला लक्ष करत धाडसी चोरी केली आहे. घरमालक प्रदीप चिंडालिया हे परिवारासह तीर्थयात्रेला रामेश्वरम येथे गेले होते. घर कुलूपबंद असल्याचे हेरून चोरट्यांनी डाव साधला आणि घरातील मौल्यवान ऐवज व रोकड लंपास करण्यात आली. ही बाब कळताच प्रदीप चिंडालिया यांचा मुलगा अक्षय याने घरी धाव घेत पाहणी केली असता लाखोंचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली, पोलिसांनी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले. चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व स्थानिक पोलिसांनी तपास हाती घेतला असून अद्याप ठोस धागेदोरे हाती लागले नाही. मात्र याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने विस्तृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.
Rokhthok News

    Previous articleAshwini Vaishnav : खा. देशमुखांचे रेल्वे मंत्र्यांना साकडे
    Rokhthok News
    वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.