Home Breaking News आणि…नाल्यावरील पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प

आणि…नाल्यावरील पूल गेला वाहून, वाहतूक ठप्प

819

रांगणा गावाजवळील घटना

वणी: तालुक्यातील रांगणा गावाजवळील गायकवाडी नाल्यावरील पुल पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवार दि.8 जुलैला दुपारी घडली. यामुळे वाहतूक व्यवस्थेसोबत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वणी ते रांगना, भुरकी असा मार्ग असून या मार्गांवर असेलेले गायकवाडी नाल्यावरील पुल अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या पुलाच्या दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला गावाकऱ्यानी अनेकदा निवेदन दिलेले आहे. परंतु गावाकऱ्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर हा पुल कोसळून पुरात वाहून गेला आहे.

वणी- रांगना- भुरकी हा सतत वर्दळीचा मार्ग असून बऱ्याच गावाचे प्रवासी या मार्गाने प्रवास करीत असतात. तसेच विद्यार्थी व शेतकरी वर्गकारिता हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. सध्या शेती हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करिता याचं मार्गाचा वापर करावा लागतो, परंतु पुल वाहून गेल्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

पूल वाहून गेल्यामुळे स्थानिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रहदारी बंद झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेती पिकाचे फार मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुलाची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करावी अशी मागणी रांगना व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

वाहून गेलेल्या पुलाचे बांधकाम त्वरित करावे अशी मागणी रांगणा ग्रामपंचायतचे उपसरपंच अँड्. दिलीप परचाके, सरपंच रंजना प्रकाश बोबडे, रविकांत वांढरे, धर्मराज जरीले, प्रकाश बोबडे, महादेव कतकर, राजेश वांढरे, दौलत दुर्गे, रामनाथ जरीले, नीलकंठ गोंडे, शेखर वांढरे, रमेश भोयर, प्रकाश बोढे, सुरेश पारशिवे, गंगाराम शिवरकर, नवरंग तेलंग, मारोती तेलंग, संजय तांबे, गजानन पाऊणकार याचेसह महिला बचत गटाच्या महिलां केली आहे.
वणी: बातमीदार