●पोलीस घटनास्थळी रवाना, शोध सुरु
Sad News | तालुक्यातील नायगांव शिवारात सात ते आठ युवक लगतच असलेल्या वर्धा नदीवर आंघोळीला गेले होते. यातील दोघे वाहून गेल्याची दुर्देवी घटना मंगळवार दिनांक 15 ऑगष्ट ला दुपारी घडली. An unfortunate incident took place on Tuesday when two people who had gone to bathe in the Wardha river were washed away
प्रविण सोमलकर (36) रा. चंद्रपूर व दिलीप कोसुरकर (40) रा नायगाव असे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. प्रवीण हा नायगाव येथील जावई होता सुट्टीमुळे तो नायगाव येथे आला होता.
नायगाव येथील मित्रमंडळींनी सुट्टीत मौजमजा करण्याचा बेत आखला होता. यामुळे 7 ते 8 तरुण लगतच असलेल्या वर्धा नदीवर पोहचले. जलतरणाचा आनंद घ्यावा म्हणून ते नदीपात्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे प्रवाहात वाहून गेले.
या अनपेक्षित घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली, पोलिसांना सूचित करण्यात आले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करताहेत.
Rokhthok News
ही बातमी सुद्धा वाचा…..